बंगलोरला येऊन २ वर्षं झाली.. एक बंगलोर सोडलं तर जवळपासची कुठलीच ठिकाणं पहिली नव्हती.. खूप दिवसांची इच्छा होती, कि विकेंडला कुठेतरी जाऊन यावं.. शेवटी मागच्या आठवड्यात कुर्गला जायचा योग आला.. सौम्या, मी, ज्योती (सौम्याची रुममेट), प्रणिता आणि श्रावणी (सौम्याच्या मैत्रिणी).. सगळी तेलेगु पार्टी अन त्यांच्यात मी एकटी मराठी.. पण त्यांनी मला बोअर होऊ नये म्हणून जास्त करून हिंदी-इंग्लिश मध्येच संभाषण केलं..
सौम्याचं अन माझं केव्हाच ठरलं होतं, कि कुठेतरी फिरायला जायचं.. कोणी येवो न येवो.. आपण मात्र जायचं.. पुन्हा पुन्हा कुठे फिरायचा चान्स मिळेलच असं नाही ना..!!
एकदाचा मुहूर्त सापडला कुर्गला जाण्याचा..!! ज्योतीने तिच्या ओळखीने आम्हा ५ जणींसाठी एक क़्वालिस ठरवली.. आम्ही पहिल्यांदाच जात होतो आणि तेही फक्त ५ मुली आणि एक ड्रायव्हर.. रवी त्याचं नाव.. प्रॉपर कन्नडा.. तो मंड्याचा मुळचा.. गाडीत बसल्यापासून ते वापस रुममध्ये पाय ठेवेपर्यंत त्याने सर्वांची चांगली काळजी घेतली..
मी ऐनवेळेस, म्हणजे शुक्रवारी घरी सांगितलं कि मी कुर्गला जातेय म्हणून.. आई तर अगदी खूष झाली.. म्हणे, "पोरगी २ वर्षांनी का होईना बंगलोरच्या बाहेर तर पडतेय.. आम्ही आल्यावर आम्हालाही फिरवून आणता येईल.. तू बघून आली म्हणजे.." पण बाबांचं सुरु झालं.. "जास्त इकडे तिकडे फिरू नको.. मैत्रिणींना सोडून कुठे एकटी जाऊ नको.. पेप्पर स्प्रे जवळ ठेवलास ना?.. चाकू/पेपर कटर आहे ना जवळ? ड्रायव्हर विश्वासू आहे का?? तिथे नदीत/पाण्यात उतरू नकोस.. धबधब्याजवळ जाऊ नकोस.. दुरून पहा.." वगैरे वगैरे.. मला तर एक क्षण असं वाटलं, कि आई बाबा आहे आणि बाबा आई आहेत.. जे आई कडून ऐकायची अपेक्षा होती, ते बाबा बोलले अन जे बाबांना बोलायला पाहिजे होतं ते आई बोलली..
असो. शुक्रवारी रात्री आम्ही १० वा. आमच्या होस्टेलमधून निघालो.. रवी मारथाहल्ली जवळच आला होता आम्हाला न्यायला.. मग आम्ही निघालो कुर्गच्या दिशेने.. रवीने सगळी कन्नडा गाणी भरून आणली होती सोबत.. ती सुरु केली वाजवायला.. सोबत तो त्यांचे अर्थही समजावून सांगत होता.. त्याला कन्नडा, तामिळ, तेलेगु अन हिंदी.. एवढ्या भाषा येतात.. त्याने जुनी कन्नडा गाणी वाजवायला सुरु केल्यावर मात्र आम्हाला झोप यायला लागली.. रस्त्यात त्याचं शहर लागलं.. मंड्या - द शुगर सिटी.. तिथे एका ठिकाणी थांबून चहा घेतला.. कोणीतरी म्हणालं, "चुईंग गम खात बसल्यास झोप येत नाही.." खरे कि खोटे ते माहित नाही.. पण आम्ही कुशलनगरला पोहोचेपर्यंत सगळ्यांचीच दांडी गुल..!! म्हैसूर केव्हा गेलं अन आम्ही कुशलनगरला केव्हा पोहोचलो, ते कळलंच नाही..
शनिवारी पहाटे ३.३० वा. कुशलनगर गाठलं.. आधी तिथेच राहायचं ठरवलं.. तिथून २० किमी अंतरावर कुर्ग आहे.. सकाळी सकाळी फ्रेश होऊन जायचं ठरवलं, पण तिथे राहण्यासाठी रूम्स मिळाल्या नाही.. मग रवीने एक-दोन ठिकाणी फोन करून एका ठिकाणी रूम्स बुक केल्या.. ४ वा. आम्ही आमच्या थांबण्याच्या ठिकाणी पोहोचलो.. ते एक घरच होते.. खाली घरमालक आणि वर रूम्स.. पाठीमागे कॉटेजेस.. रूम्सचा रेंट डिनर आणि ब्रेकफास्ट वगळून म्हटलं तर २००० एका रूम साठी.. कॉटेज मात्र खास करून हनिमूनर्स साठी होतं आणि त्याचा रेंटही जास्त होता.. आम्ही रूम्स बघायला वर गेलो.. त्यावेळेस तिकडे लाईट गेलेली.. बाहेर रातकिड्यांचा आवाज.. आजूबाजूला सगळं जंगल.. आम्हाला तिथे थांबण्याची बिलकुल इच्छा नव्हती.. पण दुसरा काही इलाज नव्हता.. रूम्स मात्र मोठ्या आणि प्रशस्त होत्या.. २ कॉट एकमेकांना जोडले तर आम्ही पाचही जणी त्यावर अगदी आरामात झोपू शकू एवढ्या.. मग आमच्यासाठी एक आणि रवीसाठी एक अशा दोन रूम्स बुक केल्या.. घरमालकाने बत्त्या आणून दिल्या.. आम्ही फ्रेश होऊन सकाळी कुठून सुरुवात करायची ते ठरवत बसलो.. पहिल्या दिवसाचा प्लान बनवून थोडावेळ झोपायला गेलो.. सकाळी ६ वा. उठायचं ठरलं.. इथे माझी पंचाईत होती.. मला ब्रश करण्यापासून ते स्नान करून बाहेर यायला ४५ मी. लागतात..(सौम्याच्या भाषेत, 'अगदी तंतोतंत आणि शिस्तबद्ध करायची सवय आहे..') मग मी आधी आवरून घेतलं आणि मग एकेकीला उठवलं.. त्यांचं आवरून होईपर्यंत मी बाहेर फिरायला निघाले..
बाहेर आल्यावर बघितलं.. रात्री अंधारात जेवढं दिसलं होतं, त्यापेक्षा कितीतरी मोठं घर होतं.. "बालाजी व्हिला" त्याचं नाव.. तिथली हिरवळ, झाडे-झुडुपे, पाठीमागे अतिशय सुंदर कॉटेजेस, नारळाची बाग, स्विमिंग पूल, कॅम्प फायर साठी प्रशस्त अशी जागा, रात्रीच्या डिनरसाठी सुंदरसे सजवलेले शेड.. आणखी बरंच काही.. भरपूर मोठा पसरलेला परिसर होता.. तेव्हा वाटलं, कि रात्री थांबण्याचा निर्णय घेतला तो योग्यच होता..
सकाळचा चहा घेऊन.. तिथे थोडे फोटो काढून आम्ही निघालो.. कुशलनगरला ब्रेकफास्ट केला.. तिथली चवच वेगळी होती.. पहाडी टाईप.. इडली-सांबार सुद्धा आम्ही आवडीने खाल्ला.. मग पहिल्या प्लेसकडे निघालो.. "तलकावेरी", जिथे कावेरी नदी उगम पावते.. जाता जाता रवीने पुन्हा आपली कन्नडा गाणी सुरु केली.. यावेळेस गाणी थोडी लेटेस्ट आणि चांगली होती.. त्यातलं एक गाणं प्रेमलोका मुव्ही मधलं (कन्नडा मुव्ही: जुही चावला हिरोईन आहे..) त्याला आम्ही ब्युटी साँग म्हणतो.. कारण त्यात शेवटी 'ब्युटी' शब्द येतो.. मला अतिशय आवडलं ते..(लिरिक्स विचारू नका प्लीज..) जेव्हा जेव्हा मी रवीच्या बाजूला बसायचे, तो हे गाणं आवर्जून लावायचा.. बाकीच्या मुली पकून जायच्या.. "वो ब्युटी साँग मत लगाना प्लीज.. और तुम तो गाना चूज ही मत करना.." त्यांना सगळ्यांना माहित आहे.. मला थोडी antique गाणी(हा पण त्यांनीच दिलेला शब्द आहे..) आवडतात.. (जुडवा/कभी हां कभी ना मधली गाणी कितीजण ऐकत असतील बरं!!) असो. आम्ही तलकावेरीला पोहोचलो.. ते जवळपास ४०००फुट उंचावर आहे.. तिथे अतिशय दाट धुकं/ढग.. थंडगार वारं.. आम्ही रात्रभर झोपलेलो नव्हतो, तरी तिथे इतकं फ्रेश वाटलं, कि थकवा कुठल्या कुठे पळून गेला.. तिथे एक कुंड आहे, जिथून कावेरी उगम पावते.. त्या कुंडातून पाणी वाहत जाऊन एका दगडी नंदीच्या मुखातून बाहेर पडतं.. तिथून मग थोड्या दूर अंतरावरून खाली वाहायला सुरुवात होते.. तिथे फक्त नंदीच्या मुखातून बाहेर येणारं पाणीच दिसतं.. त्यानंतर ते कुठून वाहतं, ते दिसत नाही.. कारण एकतर ढग आणि दुसरं गर्द हिरवी झाडी.. आम्ही ढगांमध्ये पूर्ण भिजून गेलो.. तिथे थोडावेळ थांबून, फोटोज काढून निघालो पुढे..
तोपर्यंत दुपार झाली होती.. तरी आम्हाला भूक लागली नाही.. सोबत चिप्स, स्वीट्स आणि थोडंफार खाण्यापिण्याचं सामान होतंच.. मग काय फिरण्याच्या नादात त्याच्यावरच भागवलं.. तिथून गेलो अब्बी फाल्सला (Abbi falls).. कावेरी नदीवरचा अतिशय सुंदर धबधबा आहे.. पण तिथे पाण्यात उतरायला परवानगी नव्हती.. तिथल्या झुलत्या पुलावर चढलो आणि फोटोज काढले.. आसपास फिरून वापस गाडीत येऊन बसलो.. जिथे जिथे जाल, तिथे तिथे केवळ कावेरी नदी दिसेल.. संपूर्ण कर्नाटकला पाणी पुरवठा करणारी फक्त कावेरी मुख्य नदी आणि तुंगभद्रा उपनदी आहे.. (कृष्णा कुठे गेली, हे महाराष्ट्र सरकारला नाहीतर कर्नाटक सरकारला विचारा..)
दरम्यान आम्हाला रात्रीच्या जेवणाबद्दल बालाजीवाल्याला लवकरात लवकर कळवायचं होतं.. म्हटलं, "एवढ्यात काये? सांगू ना आरामात.. अजून वेळ आहे.." "नाही नाही.. त्याला म्हणे आठ वाजण्यापूर्वी कॅम्प फायर साठी सगळी अरेंजमेंट करावी लागते.. जर आठच्या आधी असेल तर तसं सांगता येईल ना.." "अस्सं.. मग त्याला म्हणावं, तू आठच्या आधी तयारी करून ठेव कि.. कोण नाही म्हणतंय.. आम्ही आमचं जेव्हा येऊ तेव्हा जेवू.." त्यावर सगळे हसले.. त्याला फोन करून सांगितलं कि आम्ही डिनर घरीच करणार म्हणून..
त्याला कळवल्यानंतर आम्ही निघालो ओम्कारेश्वरा टेम्पलकडे.. एव्हाना खूप जोरात पाऊस सुरु झालेला.. तिथे पूजा करून, थोडे फोटो काढून येईपर्यंत आम्ही पूर्ण भिजलेलो.. तसेच निघालो पुढे..
पुढची प्लेस होती "राजा'ज सीट".. तिथे गेल्यावर कळलं कि ते गार्डन आहे.. तिकीट ५ रु. प्रत्येकी.. भर पावसात आम्ही गार्डन मध्ये फिरत होतो.. मध्येच छत्र्या उलट्या होत होत्या तुफान वाऱ्यामुळे.. "इथे कुठेच राजाची सीट नाहीये.. मला वाटलं खुर्ची किंवा तसं काहीतरी असेल..", कोणीतरी बोललं.. "इथे राजा सगळीकडे थोडा थोडा वेळ बसला असेल.. मग किती ठिकाणी बांधतील खुर्च्या.. म्हणून इथे तसं काही नाहीये..", दुसरी मस्करी करत बोलली.. तिथे बाजूलाच मिनी ट्रेन होती फिरायला.. त्यात फिरलो.. गरम गरम गोबी मंच्यूरीअन खाऊन वापस निघालो.. तेव्हा सात वाजले होते संध्याकाळचे..
पुढची प्लेस होती "राजा'ज सीट".. तिथे गेल्यावर कळलं कि ते गार्डन आहे.. तिकीट ५ रु. प्रत्येकी.. भर पावसात आम्ही गार्डन मध्ये फिरत होतो.. मध्येच छत्र्या उलट्या होत होत्या तुफान वाऱ्यामुळे.. "इथे कुठेच राजाची सीट नाहीये.. मला वाटलं खुर्ची किंवा तसं काहीतरी असेल..", कोणीतरी बोललं.. "इथे राजा सगळीकडे थोडा थोडा वेळ बसला असेल.. मग किती ठिकाणी बांधतील खुर्च्या.. म्हणून इथे तसं काही नाहीये..", दुसरी मस्करी करत बोलली.. तिथे बाजूलाच मिनी ट्रेन होती फिरायला.. त्यात फिरलो.. गरम गरम गोबी मंच्यूरीअन खाऊन वापस निघालो.. तेव्हा सात वाजले होते संध्याकाळचे..
जाता जाता सौम्या अन ज्योतीने रवीच्या मागे लागून एक व्होडकाची क्वार्टर आणि सोबत काही snacks मागवले.. त्या दोघींना टेस्ट करायची होती.. खरं तर आमच्यापैकी कोणीही कधीच घेतलेली नाहीये.. पण त्या दोघींना लहर आली.. झोपण्यापूर्वी जेव्हा त्यांनी एक एक सिप घेतला.. त्यांच्या घशात कसंतरी व्हायला लागलं.. मग माझी, श्रावणीची आणि प्रणीताची धावपळ झाली त्यांना लिंबू पाणी बनवून द्यायला.. मी त्या व्होडकाचा वास घेतला अन म्हटलं, "ए, माझ्याकडे जे dettol hand sanitizer आहे ना.. त्याच्यासारखाच वास आहे.. एखाद्या केमिकल पेंट सारखा.." त्यावर सौम्या मारायलाच धावली मला.."मूर्ख.. आधी वास घेता येत नव्हता का तुला.. तेव्हाच सांगितलं असतं तर.." "ए.. तुला व्होडका कोणी सांगीतला घ्यायला.. प्यायची एवढीच इच्छा होती तर जे झेपेल ते प्यायचं ना.." शेवटी काय तर ती बॉटल जशीच्या तशी सौम्याच्या मित्रांकडे गेली.. एन्जॉय करा म्हटलं..!!
रात्रीचे जेवण खूप छान होते.. डिनरसाठी तिथे सेपरेट छोटंसं शेड बनवलेलं होतं.. तिथली लाईटिंग, टेबलांची रचना वेगळी आणि सुंदर होती.. जेवताना त्याने गाणीसुद्धा नवीन आणि थोडी आदिवासी/नेपाळी टाईप लावली होती.. जेवणानंतर त्याने कॅम्प फायरच्या ठिकाणी नेलं.. आधीच सगळं जमवून ठेवलं होतं, फायर पेटवून तो गेला..आश्चर्य म्हणजे, तिकडे रोज पाऊस पडत असताना ते लोक वाळलेली लाकडे कुठून आणत असतील..!! आम्ही सगळे भोवती बसून अंताक्षरी खेळायला लागलो.. तेलेगु, हिंदी आणि मराठी भाषेतल्या गाण्यांमुळे अंताक्षरी चांगलीच रंगली.. मला वाटलं, माझ्या मराठी गाण्यांमुळे त्या बोअर होतील.. पण सौम्याने तर आश्चर्याचा धक्काच दिला.. तिला 'मुंबई-पुणे-मुंबई' मुव्ही मधलं 'कधी तू..' हे गाणं अतिशय आवडतं म्हणाली.. "आज कल तुम लगाते ही नहीं वो साँग.. " असं खेळता खेळता रात्रीचे ११वाजले, आम्ही रुममध्ये झोपायला गेलो.. रुममध्ये गेल्यावर लक्षात आलं कि डोकं पूर्ण भिजलं होतं.. फायरच्या जवळ बसल्यामुळे थोडा थोडा पाऊस सुरु झालेला सुद्धा कळाला नव्हता.. तर असा आमचा शनिवार तिथेच संपला..
रविवारी सकाळी ५ वाजता उठून तयार होऊन ६.३०ला सगळं समान घेऊन 'बालाजी व्हिला' सोडलं.. जाता जाता त्या मालकाचं बिझनेस कार्ड घेऊन, त्याला पुन्हा येऊ असं सांगून निघालो..
रविवारचं पहिलं स्थळ होतं 'दुबारे'.. तिथे रिव्हर राफ्टींग आणि एलिफंट राईड करता येते.. तिथेच नाश्ता केला.. तेवढा चांगला नव्हता म्हणून रात्री व्होडका सोबत खायला नेलेले snacks तिथे खाल्ले.. मग चप्पल-बूट, सामान गाडीतच सोडलं आणि निघालो राफ्टींग साठी.. लाईफ जाकेट आणि हेल्मेट चढवलं.. आणि आमची ५ जणींची स्वारी निघाली छोटी नाव वल्हवत.. सोबत आलेल्या नाववाल्याने आधीच सूचना देऊन ठेवल्या होत्या.. "फोरवर्ड म्हटलं कि पाणी मागे ढकला.. backward म्हटलं कि पुढे.. relax म्हटलं कि सगळं वजन नावेच्या आतल्या बाजूला झुकवून बाजूची दोरी घट्ट पकडायची.. खासकरून जेव्हा पाण्यात ट्विस्ट आणि टर्न येतं तेव्हा असं करायचं.." त्यानुसार आम्ही जात होतो.. रस्त्यात कित्येक प्रकारचे पक्षी, झाडे दिसली.. थोड्याश्या संथ पाण्याच्या जागी आल्यावर तो म्हणाला, "आता टाका उड्या पाण्यात.." आम्ही घाबरलो.. म्हटलं वेडबिड लागलंय का काय याला.. आम्हाला पोहता येत नाही अन हा चक्क एवढ्या मोठ्या नदीत उतरा म्हणतोय..?? आम्ही थांब थांब म्हणेपर्यंत त्याने सर्वांना ढकलले सुद्धा.. पाणी जास्त खोल नव्हते.. जास्तीत जास्त १०-१५ फुट असेल.. कुठे कुठे खडक पायाला लागत होता.. लाईफ जाकेटच्या सहाय्याने आणि सोबत बांधलेल्या दोरीच्या सहाय्याने आम्ही खूपवेळ खेळलो.. मग त्याने आम्हाला एकेकीला नावेत ओढून घेतलं.. सात किलोमीटर पर्यंत राफ्टींग करून वापस आलो.. मग कपडे बदलून फ्रेश होऊन पुढे निघालो.. एलिफंट राईड साठी मात्र थांबू शकलो नाही.. कारण राफ्टींग मध्ये आम्ही खूप वेळ घालवला होता..
रविवारचं पहिलं स्थळ होतं 'दुबारे'.. तिथे रिव्हर राफ्टींग आणि एलिफंट राईड करता येते.. तिथेच नाश्ता केला.. तेवढा चांगला नव्हता म्हणून रात्री व्होडका सोबत खायला नेलेले snacks तिथे खाल्ले.. मग चप्पल-बूट, सामान गाडीतच सोडलं आणि निघालो राफ्टींग साठी.. लाईफ जाकेट आणि हेल्मेट चढवलं.. आणि आमची ५ जणींची स्वारी निघाली छोटी नाव वल्हवत.. सोबत आलेल्या नाववाल्याने आधीच सूचना देऊन ठेवल्या होत्या.. "फोरवर्ड म्हटलं कि पाणी मागे ढकला.. backward म्हटलं कि पुढे.. relax म्हटलं कि सगळं वजन नावेच्या आतल्या बाजूला झुकवून बाजूची दोरी घट्ट पकडायची.. खासकरून जेव्हा पाण्यात ट्विस्ट आणि टर्न येतं तेव्हा असं करायचं.." त्यानुसार आम्ही जात होतो.. रस्त्यात कित्येक प्रकारचे पक्षी, झाडे दिसली.. थोड्याश्या संथ पाण्याच्या जागी आल्यावर तो म्हणाला, "आता टाका उड्या पाण्यात.." आम्ही घाबरलो.. म्हटलं वेडबिड लागलंय का काय याला.. आम्हाला पोहता येत नाही अन हा चक्क एवढ्या मोठ्या नदीत उतरा म्हणतोय..?? आम्ही थांब थांब म्हणेपर्यंत त्याने सर्वांना ढकलले सुद्धा.. पाणी जास्त खोल नव्हते.. जास्तीत जास्त १०-१५ फुट असेल.. कुठे कुठे खडक पायाला लागत होता.. लाईफ जाकेटच्या सहाय्याने आणि सोबत बांधलेल्या दोरीच्या सहाय्याने आम्ही खूपवेळ खेळलो.. मग त्याने आम्हाला एकेकीला नावेत ओढून घेतलं.. सात किलोमीटर पर्यंत राफ्टींग करून वापस आलो.. मग कपडे बदलून फ्रेश होऊन पुढे निघालो.. एलिफंट राईड साठी मात्र थांबू शकलो नाही.. कारण राफ्टींग मध्ये आम्ही खूप वेळ घालवला होता..
मग तिथून गेलो 'निसर्गधाम'ला एन्ट्री तिकीट होते प्रत्येकी १० रुपये.. आतमध्ये पुन्हा झुलता पूल, ट्री-हाऊस, काही प्राणी, पक्षी पहिले.. तिथे सुद्धा एलिफंट कॅम्प आहे.. पण पाऊस सुरु झाल्यामुळे त्यांनी बंद केला.. मग बाहेर शॉपिंग करून पुन्हा कुशलनगरला येऊन तिथल्या हॉटेलमध्ये जेवलो..
पुढे गेलो गोल्डन टेम्पलला.. ते बौद्ध लोकांचं विहार आहे.. जास्त करून तिबेटीअन शैलीत बांधकाम आहे.. खूप मोठं टेम्पल.. मध्यभागी गौतम बुद्धांची मूर्ती आणि आजूबाजूला काही बौद्ध देव-देवतांच्या मुर्त्या होत्या.. तिथे थोडावेळ बसून.. तिथल्या बौद्ध भिक्षुकांचे फोटोज घेऊन निघालो.. बाहेर गरम गरम कणसं खायला मिळाली.. तसल्या वातावरणात कणसांची मजा लुटताना काय छान वाटलं म्हणून सांगू..!!
तोपर्यंत ५ वाजत आले होते.. अजून म्युझिअम, फोर्ट, नागरहोल फोरेस्ट, इ. पहायचं राहिलेलं.. पण सगळं ६वाजता बंद होतं.. मग सरळ गेलो 'इदमुरी फाल्स' ला.. तो एक धबधबा नसून नदीवर एक बांध बांधलेला आहे.. तिकडे थोडेसे फोटो काढले.. कुर्ग फिरायचे म्हटल्यावर २ दिवस पुरणार नाहीत.. कमीत कमी ३ दिवस लागतात.. जे जे पहायचं राहिलं ते पुढच्या वेळी पहायचं आणि त्यावेळी जास्त दिवस सुट्टी घेऊन यायचं असं ठरवून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो..
वाटेत पुन्हा मंड्याला चहा आणि खाणेपिणे केले.. संपूर्ण प्रवासात रवीने आम्हाला कन्नडा बोलून बोलून पकवलं.. बाकीच्या चार जणींना कन्नडा येतं.. कारण तेलेगु-कन्नडा सिमिलर आहेत.. शेवटी त्याने मला बोलायला भाग पाडलं.. "सर्वांना कन्नडा येतं.. तुम्हालाही निदान एक वाक्य बोलावं लागेल.." सगळे आग्रह करायला लागले.. मग मी म्हणाले.."तुंबा मज्जा माडद्वे((आम्ही) खूप मज्जा केली)".. रवी तर एवढा खुश झाला.. "तुम्ही जर असाच कन्नडा बोलत राहिलात ना तर तुम्हाला मी एक ट्रीप माझ्यातर्फे फ्री मध्ये नेऊन आणायला तयार आहे.. जसा तुम्हाला तुमच्या भाषेचा अभिमान आहे तसाच आम्हालाही वाटतो.." अगदी बरोबर बोलला तो..!!
रात्री १०.३०वा. बंगलोरात पोहोचलो.. बनशंकरीहून जाता जाता तिकडच्या Woody's मध्ये गेलो.. आणि खास रवी साठी म्हणून सर्वांनी कन्नडा स्पेशल "बीसीबेळेभात" खाल्ला.. एक एक करून सर्वांना सोडून मारथहल्लीला पोहोचलो.. उतरताना मात्र आम्ही रवीकडून कन्नडा गाणी आठवणीने कॉपी करून घेतली.. आणि आमच्या पुढच्या प्रवासासाठी त्यालाच ऑर्गनायझर म्हणून ठरवून टाकलं..
खरंच.. कुर्गच्या निसर्गाच्या प्रेमातच पडलेय मी.. तिथला निसर्ग, कावेरी, डोंगररांगा.. मनाला वेड लावून गेल्या.. परत यायला मनच होत नाही तिथून.. या ट्रीपने मला पूर्णपणे बदलून टाकलंय.. मी निश्चय केलाय, कि आपण आयुष्यभर तर इथे राहणार नाहीत.. मग निदान जेवढे दिवस इकडे आहोत, तेवढे दिवस तरी इथली माती, भाषा, संस्कृती पाहून घेऊया..म्हणजे इथल्या आठवणींचा सुगंध आयुष्यभर मनात दरवळत राहील..!!