Sunday, September 11, 2011

माझी भावंडं


प्रत्येकाला एकतरी भाऊ-बहिण असतेच. सख्खे नसले तरी मावस, चुलत, मामे, आते,.. असतातच.
भावंडांच्या बाबतीत मी अगदी श्रीमंत आहे म्हटले तरी चालेल, माझ्या आईच्या माहेरचे, मावस, मामे असे मिळून आम्ही १६ भावंड आहोत.
हे सगळेच्या सगळे भायलोग म्हणजे बडे काम कि चीज असतात. अगदी रिचार्ज मारण्यासारख्या छोट्यातल्या छोट्या कामापासून ते जॉबसाठी रेझ्युम फोरवर्ड करण्यासारखे सगळे काम त्यांच्याकडून करून घेतले जाऊ शकतात.(कोणी दादा, ताई जर हे वाचत असेल, तर गुस्ताखी माफ..)
आमची मामे-मावस भावंडांची क्रमवारी मलाच आठवायला अवघड जाते: वैभवदा, मनोजदा(मनुदादा), मनीषाताई(माईताई), विनोददादा(मुन्नादादा), पवनदादा, मकरंददादा(टिंकूदादा), सतेजदादा, वर्षा(मी), मंगेश, श्रीकांत, श्रद्धा, सायली, सागर, रोहित, ईश्वरी, आदित्य.. हि उतरत्या क्रमाने नावे.
यात मी मधली आहे. तुमच्या भावंडांत तुम्ही जर मधले असाल, तर तुमची काही खैर नाही..!!
दोन्हीकडून तुमचाच पोपट होणार, हे निश्चित.. चिल्ल्या-पिल्ल्यांसोबत असले तर मोठी माणसं म्हणतात, "तू त्यांच्यांत मोठी आहेस.. तुला कळायला पाहिजे काय बरोबर आहे अन काय चूक आहे ते.."
आणि मोठ्यांसोबत असल्यावर, "ए.. तू गप्प बस.. तू अजून लहान आहेस.. तुला काय कळतंय यातलं?.." चालू असतं.
मग काय करणार बिचारी.. जाएं तो जाएं कहाँ..!!
एकतर छोट्यांना वाटते, कि वर्षूदीदी त्यांची आहे.. तिने त्यांच्यासोबत बुद्धिबळ, पत्ते, कॅरम,.. खेळायला पाहिजे.. आणि दुसरीकडे मोठ्यांची मैफिल जमलेली असते, तिकडे त्यांना वाटते, वर्षूला आता आपल्यात घ्यायला हरकत नाही..
श्रीकांत, श्रद्धा, मंगेश, सायली, सागर, रोहित, ईश्वरी अन आदित्य तसे छोट्या गटात येतात.(त्यापैकी काहीजण हायस्कूल-कॉलेजमध्ये शिकतात तरीही..) त्यांना मी त्यांच्यातलीच वाटते, म्हणून त्यांचे सारे सिक्रेट्स मला माहित आहेत.. आणि मोठ्यांच्या बाबतीतही बऱ्याचशा गोष्टी आता माहित होताहेत.(हा एक फायदा आहे मधले होण्याचा..)
छोट्यांशी खेळताना आपणही केव्हा त्यांच्यातलेच एक होऊन जातो हे कळत नाही.
पण एक गोष्ट मात्र खरी, सगळ्यांमधले नाते तेवढे पारदर्शक असायला हवे. राग-लोभ, रुसवा-फुगवा, थट्टा-मस्करी तर चालतच असतं.. हे तेवढ्यापुरते तेवढे असायला हवे, नाहीतर आपण अन त्यांच्यातलं समीकरण बिघडतं.
माझ्यासाठी माझ्या बाजूने उभी राहणारी माझी फौज म्हणजे हेच सर्व, जे गरज पडेल तेव्हा, जर वेळ आलीच तर, अगदी आई-बाबा, मावशा, काका, मामा,.. सगळ्यांच्या विरुद्ध होऊन माझी साथ देतील.
त्यासाठी मी हि अगदी चिल्लर पार्टीला सुद्धा मस्का मारत असते.(चिल्लर पार्टी म्हणजे छोट्या गटातले..)
जेव्हा जेव्हा आमची सर्वांची भेट होईल, तेव्हा एकदातरी माझी चिल्लर पार्टीसोबत सिक्रेट मीटिंग असते.(सिक्रेट मीटिंग म्हणजे मग ती गोदावरी, गोकुल, सिटीप्राईड,.. कुठेही जेवायला जाणार, पण तेव्हा फक्त आणि फक्त मी आणि चिल्लर पार्टी.. मोठे कोणीही नसणार..) मोठ्यांना मात्र सगळ्यांसोबत कॉमन डिनरला घेऊन जाते.(तसेही मोठ्यांमध्ये जवळपास सगळ्यांची लग्नं झालीयेत.. तुम्ही समजू शकता.. ते तेवढे काही कामाचे नाहीत.. आय मीन त्यांच्याजवळ तेवढा वेळ नसतो..)
मोठे यासाठीच आम्हाला रेल्वेचे डबे म्हणून चिडवतात. असो.
दरवर्षी एकदातरी आमचं रक्षाबंधन/भाऊबीजसाठी गेट-टुगेदर होत असतं, त्यावेळेस सगळे मामाकडे किंवा मावशीकडे जमतो, तेव्हा मात्र मोठे-लहान हा फरक राहत नाही.
आमच्याकडे अगदी मामा लोकांपासून प्रत्येकजण केवळ आयटी/सोफ्टवेअर क्षेत्रातच आहे, कोणीही डॉक्टर नाहीये, चिल्लर पार्टीही गणितामध्येच अग्रेसर आहे..
या बाबतीत सगळ्यांमध्ये एकी आहे.
शेवटी, सगळ्यांनी यशस्वी व्हावे, आणि महत्त्वाचे म्हणजे कितीही दूर गेलो तरीही दरवर्षी एकदातरी भेटण्याची आपली परंपरा अशीच चालू राहावी अशीच मी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना करते.

No comments:

Post a Comment